22 Jun 2012

बारीश तो है एक बहाणा ...........!!!

 
            पहिला पाऊस सर्वांना वाट बघायला लावणारा, मानवी मनाला ओलावा देणारा, संपूर्ण सृष्टीत चराचरात चैतन्य आणणारा, ओठांवर नकळत हास्य फुलवणारा, जुन्या आठवणींना उजाळा देणारा........ 'पहिला पाऊस'. निसर्ग नियमाप्रमाणे ऋतू बदलतो. चार महिन्यांच्या उन्हाने तप्त झालेली जमीन पावसाची तन्मयतेने वाट बघत असते. पहिला पाऊस येतो अन रोखलेला श्वास मोकळा होतो. वर आकाशाकडे पाहणारे डोळे सुद्धा तृप्त होतात. सर्व सामान्य माणसालाही पावसावर कविता करावीशी वाटते. पाऊस आला कि वाटते परत एकदा लहान व्हावं.............

ये शोहरत भी लेलो, ये दौलत भी लेलो ,
भले छीनलो मुझसे मेरी जवानी,
मगर मुझको लौटा दो ,
वो कागज कि कश्ती, वो बारीश का पानी........!!!

                 बालपणीच्या आठवणी मध्ये मन गुंतून जाते. पावसाची सुरवात व्हायच्या आधीच पावसाची गाणी सुरु होतात. हा पाऊसही लहान मुलासारखा निरागस असतो. तो कधीच भेदभाव करत नाही. शाळेतून घरी परतताना मध्येच पावसाने गाठलं तरी, एखाद्या झाडाखाली उभं न राहता त्या पावसाच्या सरीमध्ये भिजत घरापर्यंत चिखल तुडवत जायला खूप मजा येते घरी आल्यावर आईचा मार खावा लागतो, पण  चिंब भिजल्याने जो आनंद मिळतो  त्यापुढे आईचा मार काहीच वाटत  नाही.  बाई   वर्गात शिकवत असतात आणि आपण त्याच्या येण्याची वाट बघत असतो. एकदा तो आला मग काय मजाच मजा वर्गात फक्त दंगा करायचा. शिकवणीला सुट्टी म्हणूनच पाऊस आणि बालपण याचं अगदी जीवाभावाच नातं असतं.

               कधी हा पाऊस नाजूक, हलक्या तुषार प्रमाणे मोह लावणारा असतो. पहिला पाउस पडल्यावर मातीचा जो गंध येतो त्याची सर दुसऱ्या कशाला कशी येणार ?  ते काळेनिळे आकाश खूप दिवसा नंतर गडगडून एकमेकांना भेटणारे ढग, लख्ख  चमकणाऱ्या  विजांचा  कडकडाट  सगळीकडे  मंगलमय  वातावरणाचा  भास होतो. धरती  आकाशाच्या मिलनाला  स र्व चराचर साक्षी असतात  आणि त्यावेळी वाटत  स्वर्गाची जी कल्पना केली जाते ती यापेक्षा वेगळी काय असणार ? पानांवर त्यावेळी थबकलेले  पावसाचे थेंब बघून वाटते जणू मोत्याचा सडाच शिंपलाय कोणी आनंदाने भरभरून .....!

               पाऊस आणि मस्तपैकी गरम गरम चहा आहाहाss दुपारच्या वेळेस हलका हलका पाऊस सुरु असताना खिडकी जवळ बसून किंवा पोर्चमध्ये खुर्चीत बसून एकसारखा पडणारा पाऊस पहायलाही खूप मजा येते.
पावसाच्या पाण्याचे डबक्यात पडणारे थेंब मग त्यातून निर्माण होणारी असंख्य वर्तुळ हवेतील छान गारवा ...... मग बाहेर हात काढून आपणही काही थेंब हातामध्ये झेलायचे. सोबत सुरेश भट किंवा जगजीत सिंगची गझल. एका हाती चहाचा कप आणि मदभरा आवाज मग काय ऐश. असंच चहाचा एक एक घोट घेत पावसाला बघत राहायचं त्या  क्षणी त्या चहाची लज्जत काही औरच असते. एक वेगळीच नशा त्या चहाने चढते.

                       
         काही लोक पाऊस पडत असताना दार खिडक्या लावून झोपून राहतात. पावसात ती हि कोणा कोणाची आवड असते. पण प्रत्येक जण आपापल्या परीने पावसाचा आनंद लुटत असतो. कोणाला चिखलाचा, पावसाचा रागही येत असेल. कपड्यांवर शिंतोडे उडू नयेत म्हणून जपून   चालनारेही असतात. पण आपल्याला काय त्याचं ?
                हा पाऊस अनेक आठवणींना उजाळा देतो. कॉलेजची सुरवात, अडमिशन, नवीन मित्र मैत्रिणी, नव्या कोऱ्या पुस्तकांचा गंध, पावसात क्लासमध्येच गाण्याच्या भेंड्या, चहा - भज्यांची पार्टी.................
कितीतरी गोष्टी आठवायला लागतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पावसात ओल होताना त्या एकाच छत्रीची आठवण येते . 'तो' आणि 'ती' पावसाच्या निमित्ताने तरी एकमेकांशी बोलतात. त्यांच्यासाठी 'गोल्डन चान्सच' तो. घाबरलेली ती, भिरभिरणारी नजर, थरथरणारे ओठ, केसांच्या ओल्या बटा आणि तो स्वतः ओला होतो, पण त्याची छत्री तिच्या डोईवर धरतो. हे क्षण पुढे जन्मभर पुरतात.

                      पावसळ्यातला प्रत्येक दिवस एक उत्सव होऊन येतो. मनाला मोहविणारा अंगावर शहरा आणणारा हाच पाऊस वेडही लावतो. आपल्या सारखीच पाखरंही घरट्यात बसून पावसाची गंमत बघत असतात. पक्षिणी आपल्या पिल्लांना पंखाखाली झाकून घेते. इवल्या इवल्या चोचीने त्यांना दाना भरवते.
          हा पाऊस हसवतो, तर कोणाला रडवतो, शेतकऱ्यांच जीवन तर त्याच्यावरच अवलंबून असतं.
 काहीही म्हणा या पावसात चिंब भिजल्याने वर्षभराचा तान, थकवा दूर होतो आणि एक वेगळाच आनंद मिळतो. आता पाऊस सुरु झालाय, ओठांवर कुठल्या न कुठल्या गाण्याच्या ओळीही खेळताहेत. गा आता,............. 'टिप टिप बारिश शुरू हो गई ................!!!
 

20 Jun 2012

मद्य


सूर्य मावळत होता पौर्णिमेचा चंद्र उगवत होता. या चंद्राच्या पेल्यातून मद्य पिता पिता आकाश

आनंदाने पुलकित होऊ लागले होते. त्याच्या हातातील तो पेला अर्धवट कलंडला होता त्या

पेल्यातील मद्य चांदण्याच्या रूपाने पृथ्वीवर वाहत येत होते.

चारोळ्या

मनही उदास झाले
स्वर हि उदास झाले
विरही तुझ्या बुडाले
हे गीत ओठी आले

इवलं इवलं माझ मन
प्रेमात तुझ्या चीखं न्हालं
कुठ आड वाटेला गुपित
तुला सांगून गेलं ...!

तुझ माझ नात म्हणजे
सप्तसुरांची भाषा
माझी आसव तुझे डोळे
गोड हृदयाची भाषा

कुणीच आपलं नसतं
मग कुणासाठी आपण असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथे प्रत्येकजण एकटा असतो

जगता जगता कधी कधी
दुखःतही हसावं लागतं
ओसंडू पाहणाऱ्या अश्रुंच ओझ
कधी कधी पेलावं लागतं

19 Jun 2012

चारोळ्या

मरताना  वाटलं आयुष्य
नुसतंच वाहून गेलं
मला जगायचं,मला जगायचं
म्हणताना माझ जगायचंच राहून गेलं.

झेपेल तेवढंच दुखः
तो आपल्याला देतो
दिलेलं दुखः संपल कि
आपल्यालाच नेतो.

सरपणासाठी तोडलेल्या
ओंडक्याला एकदा पालवी फुटली
मलाच कळेना हि जगायची
जिद्द कुठली ?

बरसण्यासाची वेळ आली तर
आभाळही फितूर झालं
तेव्हा माझ गाव वेड
जळायला आतुर झालं.

इथे प्रत्येकाला ठाऊक आहे
प्रत्येकाचं गुपित
प्रत्येक जणच डागाळलेला
इथला चंद्र सुद्धा शापित.

14 Jun 2012

चारोळ्या

देवळात जाऊन मानसं
दुकानात गेल्यासारखी वागतात
चार आठ आणे टाकून
काही न काही मागतात

चढाओढ या शब्दाचा अर्थ
आपण किती उलटा लावतो
कुणी वर चढताना दिसला कि
लगेच खाली ओढायला धावतो

इमारत बनायला वेळ लागत नाही
घर बनायला वेळ लागतो
घरासाठी दोन जीवांचा
खराखुरा मेळ लागतो

आठवणींच्या देशात मी
मनाला कधी पाठवत नाही
जाताना ते खुश असत
येताना त्याला येववत नाही

तू मला स्वप्न दिलीस आणि
माझ्या रात्री जगायला लागल्या
आता चांदण्याही सवईन
सलगीन वागायला लागल्या

13 Jun 2012

Good One

Land Of Love
Ocean Of Tears
Vally Of Sorrow
End Of Life.

Tea For Milk
Milk For Tea
I For You
You For Me

You are Sweet
You are Lovely
You are Sunshine
You are My Valentine

Life is best
Not Only Waste
Only For Taste

Birds Can Fly
Roses Can Shy
You Can Forget Me
But How can I ?

11 Jun 2012

ययाती

  • समुद्र शिंपल्यात घालून कधी कुणाला दाखविता येईल का ? फुलाचे चित्र काढून कधी त्याचा सुगंध घेता येईल का ? प्रीतीची अनुभूती सुद्धा अशीच आहे.

  • जग माणसाच्या दयेवर चालत नाही ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालत माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य जी या जगात  धडपड करतो ती भोगासाठी! 
  • मरण हाच जन्माचा शेवट असेल तर मनुष्य जन्माला येतोच कशाला ?

  • दैव हे मोठ क्रूर मांजर आहे माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असतो

  • लज्जा सौंदर्याचा अलंकार आहे. सत्याचा नाही, सत्य हे नग्न असतं.

  • माणसांन उपभोग घेऊ नये अशी जर देवाची इच्छा असती, तर त्यानं शरीर दिलच नसतं, पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे. देवान माणसाला शरीराप्रमाणे आत्माही दिला आहे. शरीराच्या प्रत्येक वासनेला या आत्म्याच बंधन हवं

  • त्यागाची पुराण देवळात ठीक असतात पण जीवन हे देवालय नाही , ते रणांगण आहे.

कोण - कोणासाठी

कुणाच्या इतक्याही जवळ जाऊ नये
कि आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच हृदय जर कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकेही येऊ नये
कि पानांना ते जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे

स्वप्नात कुणाला असंही बघू नये
कि आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहीच नसावे

कुणाला इतकाही वेळ देऊ नये
कि आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी कि पदोपदी
आपण त्याचीच वाट पहावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी

कुणाचे इतकेही ऐकू नये कि
कानात त्याच्याच शब्दाचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची इतकीही सोबत असू नये
कि प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अश्रू जमावी

कुणाला इतकही माझं म्हणू नये
कि त्याचे 'मी' पण आपण विसरून जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देऊन जागे करावे

पण , पण ..............
कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये
कि आपल्या सावली शिवाय
सोबत काहीच नसावे ..........!!! 

बेधुंद...............

                  सरळ रस्त्यापेक्षा वळणावळनाचे रस्ते मला जास्त आवडतात, त्यांना माहित नसते रेघ. अशोक किंवा निलगिरी पेक्षा मला आवडतो, तो वड सगळीकडे उभा आडवा पसरलेला. एका रेषेतच जाणाऱ्या सुर्यकिरणांपेक्षा मला आवडतो, तो वारा मन वाटेल तिकडे पळणारा. सरळ पडणाऱ्या पावसाच्या थेंबापेक्षा जागा मिळेल तिथे वळणारी व डोंगरावरून खळखळत वाहणारी नदीच मला जास्त वेड लावते. माझ आयुष्ही मला असंच जगायचं उधळलं तर उधळून द्यायचंय बेभान होऊन जसं ते नेईन तसं मला त्याच्या बरोबर जायचंय अगदी मोकाट सुसाट बेधुंद होऊन ............!!!

8 Jun 2012

सुविचार

जैसे जैसे पाता गया, वैसे वैसे खोता गया /
जैसे जैसे बांटता गया, वैसे वैसे पाता गया /
स्वार्थ मे सच कडवा होता है /
परमार्थ मे  सच मीठा होता है /
बातचीत में हारजीत /
सहयोग में जीत हि जीत /
सब कि सेवा रब कि सेवा /
तुम खुद खुदा हो ,
अगर खुदा से जुदा न हो /

काहूर


या मनी तू तरी
फाटला उर का ?

पेटली आसवे
कोरडा धूर का ?

संगराच्या क्षणी
थांबला दूर का ?

तीळ गाली तुझ्या
आरसा चूर का ?

सोडला हात अन
आत काहूर का ?

डाग

      

                काही राजवाडे शापित असतात ,तशी काही सुख ही कुरतडलेली असतात .तसेच काही आनंदही पोरके असतात .योग्य व्यक्ती कडून योग्य शाबासकी ,कौतुकाचे दोन शब्द मिळाल्या शिवाय केलेल्या कामाचे समाधान पूर्ण होऊ शकत नाही. वाळलेल्या जखमेसारखा तो आनंदही कोरडा पडतो कायमचा राहतो तो मात्र त्या जखमेचा न विसरता येणारा, न मिटणार  'डाग ' .

जीवन

जीवन हा एका प्रवास आहे
तो प्रत्येकाला करावाच लागतो
स्टेशन लवकर येईलच असे नाही
त्यासाठी वाट पाहावीच लागते

जीवन हि एक यात्रा आहे
त्यात नेहमी फिरावंच लागत
जे हव ते मिळतच असं नाही
त्या साठी वन वन भटकावच लागत

जीवन एक कोड आहे
ते सर्वांना सोडवावंच लागत
ते सर्वांना सुटतचं असं नाही
त्यासाठी थोड चुकावही लागत

जीवन ही एक नाव आहे
त्यात प्रत्येकाला झुलावचं लागत
किनारा नेहमी मिळतोच असे नाही
कधी कधी भोवऱ्यात सुध्दा सापडावंच लागत .

जीवनसाथी

जीवनात कोणीतरी हक्काचा असावा
वेळप्रसंगी सावधान करणारा असावा
चुकले कधी कोणीही
मोठ्या मनाने माफ करणारा असावा

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
तो माझ्या सोबत असावा
काटे रुतले तरीही फुल समजून
त्यावर चालणारा असावा

माझ्या सुखात स्वतःचे सुख
मानणारा असावा
दुखाःतही तोच डोळे
पुसणारा असावा

जीवनात कोणीतरी
रंग भरणारा असावा
मी कोरा कागद तर
तो चित्रकार असावा

अशा व्यक्तीची मी वाट पाहते
तोच माझा जीवनसाथी असावा
संपूर्ण आयुष्यात तो सोबत असावा
मी कविता तर तो माझा कवी असावा .

प्रश्न : उत्तर

प्रश्न :-  स्वर्ग मेरी मुठ्ठी मे हो इसके लिये मै क्या करू ?
उत्तर :- कुछ मत करो बस इतना हि करो कि दिमाग को थंडा रखो ,जेब को गरम रखो ,आंखो मे शरम रखो ,जुबान को नरम रखो ,और दिल में रहम रखो अगर तुम ऐसा कर सके तो फिर तुम्हे किसी स्वर्ग तक जाने कि जरुरत नही है स्वर्ग खुद तुम तक चलकर आयेगा विडंबना तो यही है कि हम स्वर्ग तो चाहते है मगर स्वर्गीय होना नही चाहते .....!

सत्य

सत्याचा मार्ग कठीण आहे हजारो लोक या मार्गाने जाण्याचा विचार करतात ,परंतु त्यापैकी फक्त शंभरच त्या मार्गाने जाऊ शकतात , नऊशे फक्त विचार करूनच थांबतात .या मार्गाने जाणाऱ्या शंभर पैकी फक्त दहाच पोहचू शकतात नव्वद तर वाटेतच भरकटतात आणि जे दहा पोहचतात त्यांच्या पैकी एकालाच सत्य उपलब्ध होऊ शकते बाकीचे नऊ किनाऱ्यावर येऊन बुडतात ,म्हणूनच म्हणतात कि सत्य एकमेव आहे .लक्षात ठेवा कि सत्य हे पिडीत होऊ शकते पण पराजित होऊच शकत नाही .....!

प्रकाशगीत

पहाट धुक्यात न्हाता
हा गंध फुलांना आला
काळोख पारखे पक्षी
झुलती केशर झुला ....

व्याकूळ पाऊल वाटा
अधिरलेले अरण्य
रानभर सांडलेले
केव्हाचे प्रकाश पुण्य ....

गवत मलमली थोडे
मधाळ हसले तेव्हा
छेडून लाघव शिळ
थिरकला रानरावा ....

ओल्या वाळूत कधीची
हि दिसते पाऊल खूण
कोण सखी हि गेलेली
हळूच लावण्य शिंपून ....

पहाट कांचन गौर
हळूच सकाळ होते
गंधल्या रानवाटेत
मी प्रकाशगीत गाते .....!

5 Jun 2012

शेरो शायरी

चाह रखने वाले , मंजीलोको ताकते नही ,
बढ कर थाम लिया करते है .........,
जिनके हाथोमे हो वक्त कि कलम .......,
अपनी किस्मत को खुद लिखा करते है ......!!!

ख्वाहीशोको दबाना गलत है ,
रह रह के किसीको सताना गलत है ,
दुश्मन है वो इन्सानियत  के .........,
जो कहते है दिल लगाना गलत है ...!!!

हवा से कह दो.......,
अपनी औकात मी रहे........ ,
हम पंखो से नही...........,
हौसालोसे उडा  करते है ....!!!

मंजिले उनही को मिलती है......,
जिनके हौसलो में जान होती है........,
पंख से कुछ नही होता ........,
हौसलो से उडान होती है .......!!!

हमको मिटा सके ये....,
जमाने में दम नही ......,
हमसे जमाना है ......,
जमाने से हम नही ......!!!