28 Sept 2012

चारोळ्या

सूखाला
अंत नाही,
म्हणूनच माणूस
शांतं नाही..

माझ्याकडॆ तुझ्या एका प्रष्नाचं
राखून ठेवलेलं उत्तर आहे
ते उत्तर म्हणजे माझ्यासाठी
बंद कूपीतलं अत्तर आहे

कागद उरले तर चालतात
पण उरलेल्या शब्दंचं ओझं होतं
इतरांच माहीत नाही
पण बरेचदा तसं माझं होतं

रात्र म्हणजे मला वाटतं
जरा उसंत मिळते जगायला
आणि लोकं म्हणतात वेड्याना
कारण लागत नाही जागायला

माझ्या आयुष्याचे दोन भाग पडतात
एक तू दिसायच्या आधी दुसरा तुला पाहिल्यानंतर
आणि तसं पाहिलं तर दोन्हीमधे
फक्त... एका क्षणाचं अंतर

No comments:

Post a Comment