25 Aug 2012

मैत्री

बालपण

चला जेवायला .............!!!


वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रम्ह
उदार भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म..........!!!

!! बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय !!!

24 Aug 2012

आठवणी

कॅण्टीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठले खिशात तेव्हा
उधारीचच खात राव ...!

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं ....!

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक  ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पान
आणि पेन सुद्धा चोरलेला ...!

परीक्षा जवळ आली कि
मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्न उदयाची म्हणून
झोपही शहाण्या सारख्या वागायच्या....!

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरान सोबत
जून झाड भरायचं ....!

अशी वर्तुळ भरता भरता
कळलं अरे कागदच भरला
वर्तुळ झाल्या कागदाला
फक्त सलाम करायचा उरला ....!

पुन्हा नवीन रस्ता
पुन्हा नवीन साठी
जुन्या रस्त्याच्या प्रवासाच्या
फक्त आठवणीच हाती .....!

 


चारोळ्या,

रात्र ओसरली पण
दिवस हाताशी येइना
कारण मनात उगवलेला चांदोबा
माघारी जाईना...

तुझ्यावर रागवायचं म्हणजे...
मलाच शिक्षा
मग शहाण्यासारखं वागलं तर काय वाईट
त्या पेक्षा...

तुझी सावली सुद्धा ओळखेन
तू कधी हरवलास तर...
पण मी बाकी राहीनच कशी
तू माझ्यापसनं दुरावलास तर

सगळच कुठे खरं असतं
जे आपण खरं म्हणून धरतो
कितिदा आपण आपली घागर
पाण्याशिवाय भरतो...

कोणी नं सांगता श्रावण
ओळखता यायला हवा
कारण श्रावण म्हणजे दरवर्षी
एक अनुभव असतो नवा...

चारोळ्या

टाळता आलं असतं तर नक्कीच
मी तुझ्य़ाकडे पाहयचं टाळलं असतं
बाकी कुणाला नाही पण
तुला ते नक्कीच कळलं असतं...

माझ्या रागाचं मुख्यं कारण
हेच आहे
कायम माझ्या मागचा शहणा
आणि माझ्य़ा पायाला ठेच आहे

तिरप्या उन्हातली गम्मत
तीरप्या उन्हात कळते
जेंव्हा माझी सावली लांबत जाऊन
तुझ्या सावलीला मिळते....

चंद्रालाही माझं घर
तुझ्यामुळे माहीत,कारण
मी रात्री त्याच्या सोबत जागतो
तुझ्य़ा स्वप्नांसहीत...

आपण ह्याचा हा आणि त्याचा तो करत
किती कप्प्यात वाटले जातो
कितिदा नको असताना
किती तुकड्यात फाटले जातो...

-चंद्रशेखर गोखले

कान्हा


यशोदेचा खटयाळ  कान्हा बाई गं .......,
खोड्या करितो घरावर काही ...........!!धृ !!


एके दिवशी गं केली यान गंमत
माझ्या पलंगावर सोडला मुंगस
भर रस्त्यावरी लोक हसती सारी .......!!१!!


एके दिवशी गं केली यान खोडी
सारी गाई वासरे सोडी
भर रस्त्यावरी लोक हसती सारी .......!!२!!


एका जनार्दनी लई राधा
शरण आले तुला मुकुंदा
भर रस्त्यावरी लोक हसती सारी .......!!३!!

अंगाई


स्वप्नांचा झुला, कान्हा झोपला,

जा जा रे वार्या झोका दे त्याला,

चांदण्यांची शाल करुनिया घाल,

घाल पाखरा मंजुळ शील,

आशेची दोरी  घेऊन हाती,

जोजावते हि आई देवकी गाते

अंगाई.....................!!!

13 Aug 2012

चारोळ्या

भिंतीकडे तोंड केलं म्हणजे
जगाकडॆ पाठ होत नाही
याचा अर्थ इतकाचकी आपल्याला
जगाला तोंड देता येत नाही.....

तो निवांत उतरलेला थवा...
आणि दबा धरून बसलेला शिकारी
आणि माझ्यापेक्षा वरचढ...
त्याची नजर विखारी...

लहानपणी...
बरं होतं
डोंगरा मागचं जग
खरं होतं..

जगणं आणि जगून दाखवणं
यातला फरक आता मला कळतोय
तू नाहीस तर भर पावसात मी
आतकुठेतरी जळतोय......

माझ्या मनाचा एक कप्पा
मी कुणाला उघडू देणार नाही
देणार नाही आपलं म्हणायचं
नाहीतर तो मलाही उघडता येणार नाही.


- चंद्रशेखर  गोखले

ययाती - एक सुंदर कल्पना

                              त्या काव्यातली नायिका माझ्यासारखी जागीच असते. नायक मात्र निद्रावश झालेला असतो. समोरच्या खिडकीतून चंद्र बिंब दिसू लागते. नायिका आपल्या निद्रिस्त पतीकडे पाहते.त्याचा मुखचंद्र आकाशातल्या चंद्रापेक्षा सुंदर आहे असे तिला वाटते. या बाहेरच्या चंद्राची आपल्या वल्लाभाच्या मुखचंद्राला दृष्ट लागू नये म्हणून ती तो झाकून टाकू पाहते. पण आपल्या प्रियकराला तोंडावरून अगदी तलम पांघरून सुद्धा घ्यायची सवय नाही हे तिला पुरेपूर ठाऊक असते. तसले पांघरून घातले कि लगेच त्याची झोपमोड होते! म्हणून ती आपल्या नाजूक पदराने देखील त्याचे मुख झाकू इच्छित नाही, मग करायचे काय ?आकाशातल्या या मत्सरी चंद्रापासून वल्लभाचे संरक्षण कसे करायचे ? एकदम तिला एक कल्पना सुचते. त्या दिवशी तिने मोठी सुंदर केशभूषा केलेली असते. तिचे कौतुक करून नायक झोपी गेलेला असतो. आता त्या केशभूषेचातिला काही उपयोग नसतो झटकन ती ती केशभूषा विस्कटून टाकते. तिचा विपुल केशकलाप मोकळा होतो! त्या मोकळ्या केसांनी ती पतीच्या मुद्रेकडे अगदी वाकून निरखून पाहू लागते साहजिकच तिच्या प्रियकराचे मुख त्या केसांनी झाकले जाते त्याला आकाशातल्या चंद्राची दृष्ट लागण्याचा संभाव नाहीसा होतो !!