25 Aug 2012
चला जेवायला .............!!!
24 Aug 2012
आठवणी
कॅण्टीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठले खिशात तेव्हा
उधारीचच खात राव ...!
कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं ....!
बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पान
आणि पेन सुद्धा चोरलेला ...!
परीक्षा जवळ आली कि
मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्न उदयाची म्हणून
झोपही शहाण्या सारख्या वागायच्या....!
पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरान सोबत
जून झाड भरायचं ....!
अशी वर्तुळ भरता भरता
कळलं अरे कागदच भरला
वर्तुळ झाल्या कागदाला
फक्त सलाम करायचा उरला ....!
पुन्हा नवीन रस्ता
पुन्हा नवीन साठी
जुन्या रस्त्याच्या प्रवासाच्या
फक्त आठवणीच हाती .....!
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठले खिशात तेव्हा
उधारीचच खात राव ...!
कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं ....!
बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पान
आणि पेन सुद्धा चोरलेला ...!
परीक्षा जवळ आली कि
मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्न उदयाची म्हणून
झोपही शहाण्या सारख्या वागायच्या....!
पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरान सोबत
जून झाड भरायचं ....!
अशी वर्तुळ भरता भरता
कळलं अरे कागदच भरला
वर्तुळ झाल्या कागदाला
फक्त सलाम करायचा उरला ....!
पुन्हा नवीन रस्ता
पुन्हा नवीन साठी
जुन्या रस्त्याच्या प्रवासाच्या
फक्त आठवणीच हाती .....!
चारोळ्या,
रात्र ओसरली पण
दिवस हाताशी येइना
कारण मनात उगवलेला चांदोबा
माघारी जाईना...
तुझ्यावर रागवायचं म्हणजे...
मलाच शिक्षा
मग शहाण्यासारखं वागलं तर काय वाईट
त्या पेक्षा...
तुझी सावली सुद्धा ओळखेन
तू कधी हरवलास तर...
पण मी बाकी राहीनच कशी
तू माझ्यापसनं दुरावलास तर
सगळच कुठे खरं असतं
जे आपण खरं म्हणून धरतो
कितिदा आपण आपली घागर
पाण्याशिवाय भरतो...
कोणी नं सांगता श्रावण
ओळखता यायला हवा
कारण श्रावण म्हणजे दरवर्षी
एक अनुभव असतो नवा...
दिवस हाताशी येइना
कारण मनात उगवलेला चांदोबा
माघारी जाईना...
तुझ्यावर रागवायचं म्हणजे...
मलाच शिक्षा
मग शहाण्यासारखं वागलं तर काय वाईट
त्या पेक्षा...
तुझी सावली सुद्धा ओळखेन
तू कधी हरवलास तर...
पण मी बाकी राहीनच कशी
तू माझ्यापसनं दुरावलास तर
सगळच कुठे खरं असतं
जे आपण खरं म्हणून धरतो
कितिदा आपण आपली घागर
पाण्याशिवाय भरतो...
कोणी नं सांगता श्रावण
ओळखता यायला हवा
कारण श्रावण म्हणजे दरवर्षी
एक अनुभव असतो नवा...
चारोळ्या
टाळता आलं असतं तर नक्कीच
मी तुझ्य़ाकडे पाहयचं टाळलं असतं
बाकी कुणाला नाही पण
तुला ते नक्कीच कळलं असतं...
माझ्या रागाचं मुख्यं कारण
हेच आहे
कायम माझ्या मागचा शहणा
आणि माझ्य़ा पायाला ठेच आहे
तिरप्या उन्हातली गम्मत
तीरप्या उन्हात कळते
जेंव्हा माझी सावली लांबत जाऊन
तुझ्या सावलीला मिळते....
चंद्रालाही माझं घर
तुझ्यामुळे माहीत,कारण
मी रात्री त्याच्या सोबत जागतो
तुझ्य़ा स्वप्नांसहीत...
आपण ह्याचा हा आणि त्याचा तो करत
किती कप्प्यात वाटले जातो
कितिदा नको असताना
किती तुकड्यात फाटले जातो...
-चंद्रशेखर गोखले
मी तुझ्य़ाकडे पाहयचं टाळलं असतं
बाकी कुणाला नाही पण
तुला ते नक्कीच कळलं असतं...
माझ्या रागाचं मुख्यं कारण
हेच आहे
कायम माझ्या मागचा शहणा
आणि माझ्य़ा पायाला ठेच आहे
तिरप्या उन्हातली गम्मत
तीरप्या उन्हात कळते
जेंव्हा माझी सावली लांबत जाऊन
तुझ्या सावलीला मिळते....
चंद्रालाही माझं घर
तुझ्यामुळे माहीत,कारण
मी रात्री त्याच्या सोबत जागतो
तुझ्य़ा स्वप्नांसहीत...
आपण ह्याचा हा आणि त्याचा तो करत
किती कप्प्यात वाटले जातो
कितिदा नको असताना
किती तुकड्यात फाटले जातो...
-चंद्रशेखर गोखले
कान्हा

यशोदेचा खटयाळ कान्हा बाई गं .......,
खोड्या करितो घरावर काही ...........!!धृ !!
एके दिवशी गं केली यान गंमत
माझ्या पलंगावर सोडला मुंगस
भर रस्त्यावरी लोक हसती सारी .......!!१!!
एके दिवशी गं केली यान खोडी
सारी गाई वासरे सोडी
भर रस्त्यावरी लोक हसती सारी .......!!२!!
एका जनार्दनी लई राधा
शरण आले तुला मुकुंदा
भर रस्त्यावरी लोक हसती सारी .......!!३!!
13 Aug 2012
चारोळ्या
भिंतीकडे तोंड केलं म्हणजे
जगाकडॆ पाठ होत नाही
याचा अर्थ इतकाचकी आपल्याला
जगाला तोंड देता येत नाही.....
तो निवांत उतरलेला थवा...
आणि दबा धरून बसलेला शिकारी
आणि माझ्यापेक्षा वरचढ...
त्याची नजर विखारी...
लहानपणी...
बरं होतं
डोंगरा मागचं जग
खरं होतं..
जगणं आणि जगून दाखवणं
यातला फरक आता मला कळतोय
तू नाहीस तर भर पावसात मी
आतकुठेतरी जळतोय......
माझ्या मनाचा एक कप्पा
मी कुणाला उघडू देणार नाही
देणार नाही आपलं म्हणायचं
नाहीतर तो मलाही उघडता येणार नाही.
- चंद्रशेखर गोखले
जगाकडॆ पाठ होत नाही
याचा अर्थ इतकाचकी आपल्याला
जगाला तोंड देता येत नाही.....
तो निवांत उतरलेला थवा...
आणि दबा धरून बसलेला शिकारी
आणि माझ्यापेक्षा वरचढ...
त्याची नजर विखारी...
लहानपणी...
बरं होतं
डोंगरा मागचं जग
खरं होतं..
जगणं आणि जगून दाखवणं
यातला फरक आता मला कळतोय
तू नाहीस तर भर पावसात मी
आतकुठेतरी जळतोय......
माझ्या मनाचा एक कप्पा
मी कुणाला उघडू देणार नाही
देणार नाही आपलं म्हणायचं
नाहीतर तो मलाही उघडता येणार नाही.
- चंद्रशेखर गोखले
ययाती - एक सुंदर कल्पना
Subscribe to:
Posts (Atom)