30 Jul 2012

चारोळ्या

पुसणारं कोणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
कुणाचे डोळे भरणार नसतील
तर मरणसुद्धा व्यर्थ आहे.

माझ्या हसण्यावर जाऊ नका
माझ्या रूसण्यावर जाऊ नका
जरी तुमच्यात असलो तरी
माझ्या असण्यावर जाऊ नका

तू गेल्यावर वाटतं
खूपसं सांगायचं होतं
तू खूपसं दिलास तरी
आणखी मागायचं होतं

इथं वेड असण्याचे
खुप फायदे आहेत
शहाण्यांसाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत

तुला वजा केल्यावर
बाकी काही उरत नाही
तुझ्या शिवाय आयुष्य
मी आयुष्यच धरत नाही.

-चंद्रशेखर गोखले


उखाणे

१ रुप्याची डबी त्यात अत्तराचा बोळा
.............. चे शब्द लाख रुपये तोळा.
२ सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण
.............. नाव घेते ऐका सारेजण.
३ चांदीच्या वाटीत काढले वरण
............. नाव ................... कारण ?
४ काचेच्या वाटीत चकचक दही 
माझ्या मंगळसूत्रावर.............. ची सही.
५ औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद माझं गावं
........... नाव घेते ............ माझं नाव .
६ पाव्याचा सूर बासरीची धून
.............. चे नाव घेते .........सून.
७ जन्म दिला मातेने पालन केले पित्याने 
......... चे नाव घेते पत्नी या नात्याने .
८ निळ्या निळ्या आकाशात सोन्यासारखे तारे
............ च्या प्रेमाचे असेच वाहोत वारे.
९ गो-या गो-या हातावर मेहंदी रंगली छान
......... चे नाव घेते  राखून तुमचा मान.
१० संक्रांतीच्या सणाला साज करते सगळा
............ ची वाट पाहते दिवस गेला सगळा.

विचार

  • जे स्वतःच्या पुस्तकाची पाने उघडी ठेऊन वावरतात, त्याला वाळवी खात नाही, पण कोणी आपले रहस्य जाणिल व आपण हलके ठरू म्हणून जो स्वतःचे पुस्तक बंद ठेऊन वावरेल त्याची पाने आतल्या अंधारात सडून जातील.
  • जीवनात सर्वांना प्रसन्न राखायला जल तर शेवटी वसंताचा गुलाबी काळ हातातून निघून जाईल.
  • पाऊस  आणि जमीन याचं किती सुंदर प्रेम पावसाचा प्रत्येक थेंब झेलायला आतुर असते.
  • प्रीती हि कधी उमलणा-या फुलासारखी असते तर कधी उफाळणा-या ज्वालेसारखी दिसते, ती कधी हरिणीचे रूप घेते तर कधी नागिणीचे रूप घेते ती कधी जीव घेते तर कधी जीव देते.
  • प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे   देतं ते प्रेम कुणावरही असो मात्र ते खरखुरं प्रेम असायला हवं! ते हृदयाच्या गाभ्यातून उमलायला हवं! ते स्वार्थी लोभी किंवा फसवं असता कामा नये प्रिय व्यक्तीचा तिच्या दोषांसह स्वीकार करण्याची शक्ती ख-या प्रेमात असते.
  • जीवनात प्रेम हि एक उच्च भावना आहे, पण कर्तव्य तिच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी भावना आहे. कर्तव्याला कठोर व्हावं लागतं पण हाच धर्माचा मुख्य आधार आहे.
  • आठवणी कशा असतात ? स्वच्छंद फुलासारख्या ? पाठशिवणीचा खेळ खेळणा-या मुलीसारख्या हळूहळू मिसळत जाऊन चित्र सौंदर्य वाढविना-या रंगासारखा वर्षाकालात आकाशात स्वैरपणे   चमकणा -या विजेसारख्या ? कुणाला ठाऊक ?
  • संकटे कुणाला चुकली आहेत! उलट या जगात ती सज्जनांच्याच वाट्याला अधिक येतात.
  • या जगात जन्माला येण्याचा मार्ग एकच आहे, तसं मरणाचं नाही , मृत्यू अनेक वाटांनी येतो! कुठूनही येतो!
  • रिकामा कलश भरला जात असताना आवाज करतो, तो पूर्णपणे भरल्यावर निशब्द होतो. प्रेमिकांची हृदये अशीच असतात. ती पूर्णपणे भरल्यावर तिथे शब्दांना अवकाश नसतो.
  • प्रीतीची भूक भूक नव्हे तर काय ? मध्यान्हीच्या क्षुधेसारखी, मध्यरात्रीच्या निद्रेसारखी, ग्रीष्मातल्या तृशेसारखी असलेली प्रीतीची हि भूक मोठी विचित्र असते. जितकी सूक्ष्म तितकीच प्रखर.
  • स्त्रियांबरोबर चिरकाल स्नेह ठेवणं शक्य नसतं कारण त्यांची हृद्य लांडग्यांच्या हृद्यासारखी असतात.
  • माणसांच्या पोटात शिरण्याचा मार्ग त्याच्या हृदयातून असतो .
  • मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हि सारथी आणि मन हा लगाम आहे. विविध इंद्रिय हे घोडे उपभोगाचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग आणि इंद्रिय व मन यांनी युक्त असा आत्मा हा त्यांचा भोक्ता आहे.
  • माणसाच्या रक्ताची चटक  लागलेला वाघ आणि स्त्रीच्या सौंदर्यावर मोहून गेलेला पुरुष दोघेही सारखेच .
  • कुठलीही वासना वाघासारखी असते काय ? तिला ज्या उपभोगाची एकदा चटक लागते, त्याच्यामागे ती वेड्यासारखी धावत सुटते! वासनेला फक्त जीभ असावी ! कान, डोळे, मन, हृद्य काही काही देवाने तिला दिलेले नाही. तिला दुसरे तिसरे काही कळत नाही. कळते फक्त स्वतःचे समाधान !
  • वायू हा जगाचा प्राण आहे त्याच्या मंद लहरी सदैव सर्वांना प्रिय वाटतात; पण तोच झंझावाताचे स्वरूप धारण करतो. तेव्हा जगाला नकोसा होतो प्रत्येक वासनेची स्थिती अशीच असते.
  • उपभोग घेऊन वासना कधीही तृप्त होत नाही आहुतींनी अग्नी जसा भडकतो. तशी उपभोगाने वासनेची भूक अधिक वाढत जाते.
  • पाप आणि पुण्य ह्या धूर्त पंडितांनी आणि मूर्ख माणसांनी प्रचलित केलेल्या काल्पनिक गोष्टी आहेत या जगात सुख आणि दुख या दोनच काय त्या ख-या गोष्टी आहेत. बाकी सर्व माया आहे. पाप आणि पुण्य हे नुसते मनाचे भास आहेत. 

सहवास

             पाण्याचा एक थेंब जर तव्यावर पडला तर त्याच अस्तित्व संपत, जर तो कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो, आणि जर शिंपल्यात पडला तर तो मोतीच होतो. पाण्याचा थेंब सारखाच फरक फक्त सहवासाचा....!

कविता

 जीवन ही आहे एक रम्य पहाट
संकटांनी गजबजलेली वादळवाट
सोनेरी क्षणांची एक आठवण
सुख दुखाच ते एक गोड कालवण
प्रेमाच्या पाझरांची वाहती सरिता
नात्यांच्या अतूट शब्दांनी गुंफलेली कविता.....!!!

पार्टनर - व पु काळे

    ती तिची खास स्टाईल तिला जेव्हा एखाद विधान पटत नाही, तेव्हा ती खूप हसत राहते त्या हसण्याने ती तुमच्यातली हवा काढून टाकते. मी तिला म्हणालो,' तुझं हे हसणं क्लोरोफार्म सारखं आहे समोरच्याला आपण फारच येडपटा सारखा बोललो कि काय असं वाटायला लावायचं आणि मग तो सावध व्हायच्या आत त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची, असं हे तंत्र आहे.
  • पुरुष हा निसर्गतः च पॉंलीगेमिस्टिक असतो . त्याला नाविन्याची भूक असते चटक असते.
  •  पोरगी म्हणजे एक झुळूक अंगावरून जाते,अमाप सुख देऊन जाते पण धरून ठेवता येत नाही.
     
     
 

28 Jul 2012

सुख दुख:

दुख:च्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारू बिरू पिऊन
झिंगली होती कार्टी

दुख: म्हणाले 'दोस्तांनो'
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छळंल म्हणून
राग माणू नका !

मनात खूप साठलं आहे
काहीच सुचत नाही
माझी स्टोरी सांगितल्याशिवाय
आता राहवत नाही

मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो,
पाच वर्षाचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो,

गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला,
माणसांच्या गर्दीत
सुखाचा हात सुटला,

तेंव्हा पासून फिरतोय
शोधत दुनियेच्या जत्रेत,
दिसतोय का 'सुख' माझा
कुणाच्याही नजरेत,

सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दुख: ढसाढसा रडले,

नशा सगळ्यांची उतरली
दुखा:कडे पाहून ,
दुख:लाही सुख मिळावे
वाटले राहून राहून !

सुखाच्या शोधामध्ये आता
मी सुध्दा फिरतोय,
दुखा:ला शांत करायचा
खूप प्रयत्न करतोय .....

जीवनाच्या रथाचे आहेत
सुख दुख: सारथी
सुख मिळाले तर
दुखाच्या घरी मीच देईन पार्टी .....!!!. 

 

12 Jul 2012

आग्रहाचे निमंत्रण - अखेर क्रांती चौक उड्डाणपुल तयार - शनिवारी होणार उद्घाटन

  बहुचर्चित क्रांती चौक उड्डाणपुलाचे उद्घाटन शनिवारी (14 जुलै) सार्वजनिक उपक्रममंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

                  जालना रोडवरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या वतीने 2009 मध्ये क्रांती चौक उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले होते. पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना निर्माणाधीन चार खांबांना तडे गेल्याने बांधकाम थांबवण्यात आले होते. समितीने दिलेल्या अहवालानुसार चार खांब आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवतालचा स्लॅब पाडण्यात आला. साडेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने या पुलाचे उद्घाटन लांबले होते. अखेर पुलाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक उपक्रममंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 14 जुलै रोजी येण्यास होकार दिला. मंत्रालयातील अग्निकांडामुळे अधिवेशनात गोंधळ होण्याची शक्यता असल्याने उपमुख्यमंत्री उद्घाटनास उपस्थित राहाण्याची शक्यता कमी असलीतरी त्यांनी होकार दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.


























 
                  

7 Jul 2012

एक चांदणी................!!!

                           
                       सायंकाळची कातरवेळ. सूर्य पश्चिमेच्या डोंगराआड जाता जाता आपल्या अंतरंगातले, इंद्रधानुतले सप्तरंग या निरभ्र आकाशावर उधळत होता. आकाश त्या विविध रंगानी उजळून निघाले होते. झाडांच्या सावल्या दिवसभर उभ्या राहून थोडा विसावा घेत झाडाच्या पायथ्याशी उद्याची पहाट उगवेपर्यंत पहुडल्या होत्या. चांदण्यांनी आकाशात गर्दी केली. अशा वेळी माझ मनही हळवं होत होत. एखाद्या सुंदर तळ हातावर मेंदीचा केशरी रंग खुलून निघावा आणि ते हात हातात घेऊन त्या रंगाना स्पर्श करावा त्या मेंदीचा गंध श्वासाश्वासात घेऊन अवती  भोवती असाच दरवळत रहावा असं वाटत होत.
                      सायंकाळ मंदावली निशा आपलं अस्तित्व जागवायला लागली. मंदिरातले दिवे वाऱ्याच्या झुळकीने हेलकावू लागले. गाभाऱ्यातून येणारा घंटेचा आवाज चोहीकडे निनादू लागला अगरबत्तीचा आणि त्या ईश्वर चरणी वाहिलेल्या फुलांचा गंध माझ्या अवती भोवती दरवळून श्वासाश्वासात फुलू लागला. मी सत्य आणि वास्तवात जाणीवा शोधू लागलो. आता सर्वत्र अंधाराच साम्राज्य पसरलं होत. आकाश ढगाळून येऊन, तरीही चांदण्या मुक्तपणे लुकलुकू लागल्या पौर्णिमेचा चंद्र उजळून प्रकाशमान झाला. ढगांमुळे त्याचा प्रकाश कधी लख्ख तर कधी धूसर होऊ लागला. त्याच्या उजळपणाचा प्रकाश मी  न्याहाळत डोळ्यातून साठवू लागलो. माझी नजर त्याच्यावरून हटतच नव्हती. इतक्यात हजारो  चांदण्यातली एक चांदणी जी चंद्राच्या समीप असलेली मला म्हणाली  -
" ए मेहपीयार 
इतना भी मत देखो की,
हमारे चांद को तुम्हारी
नजर न लग जाए ! "

मी तीच्या या बोलण्याने भारावून गेलो आणि पुढे म्हणालो -

" ऐ चांदणी
तुम्हारे चांद से भी खुबसुरत
चांद मेरे पास हैं ! "

                    माझ्या या वाक्यावरून ती प्रश्नांकित होऊन मलाच म्हणाली - " वो कैसे..............? "
मग मी म्हणालो -
" ए चांदणी, जरा अपनी
पलके उठाकर देखना, इस धरतीपर
कही तो वो तुझे नजर आएगा ! "
" सिर्फ दिल कि आवाज उसे देना
तुझे मेरा चांद दिखाई देगा ! "

                  माझ्या या प्रश्नांकित वाक्याने ती शोधू लागली तिला. शोधता - शोधता ती बावरून गेली आणि थोडासा विसावा घेत मला म्हणाली -

" आपका चांद  हमें नजर नहीं आया ! "

              माझ्याकडून न राहवत मी म्हणालो - ' तू मनापासून नाही शोधलस तिला मी  काय म्हणतो  ते आता  ऐक जरा -
" दिल से आवाज दे रहा है,
तुम गौर से सुनो जरा,
उस चांद का परदा उठाकर तुम्हे दिखाएंगे
मेरी इन आंखोमें खो जाओ जरा !"
ती माझ्याकडे एक टक पाहत राहिली आणि माझ्या हृदयातील सादेला प्रतिसाद देऊ लागली -

" चांद  आंगडाईया ले रहा है
चांदणी मुस्कुराने लगी है
एक भूलीसी कहाणी
मुझे फिर याद आने लगी है ! "

            या काव्याफुलांनी ती खळखळून हसली तिचं मन हळवं झालं ती डोळ्यात पाणी आणून मला म्हणाली -
" ऐ हमसफर सबकुछ भूलाकर
हमारा दोस्ती का पयाम काबुल करना,
जिंदगी अधुरी लगने लगी है
अब तुम्हारे बिना ...............! "

तिच्या या मैत्रीच्या बंधनाला मी होकार दिला, ती फुलली आणि बेधुंद होऊन चमचमत म्हणाली -

" ऐ मेरे हमसफर
हम तो आप पर हो गये फिदा
अब न कटेगा ये सफर अधुरा
तुम्हारे बिना ............! "

तिच्या या बोलण्याने मी हळवा झालो, उत्तर देत तिला म्हणालो -

" ऐ सनम मानता हुं
जालीम है दिल का लगना,
मगर, ये दिल किसी और का हो चुका है
दुबारा ऐसी बात भी न करना,
क्युं की  मुश्कील होगा
बहते आंसूओ को संभालना ! "

                        माझ्या या बोलण्यान खरंच तिच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या, तिचा कंठ दाटून आला. पापण्यांच्या कडावरून तिच्या अश्रुधारा ओसंडून वाहू लागल्या. तिचा चेहरा हळूहळू मंदावू लागला. माझ्या साऱ्या शरीरावर धुकं साचलं पण हे धुकं केवळ धुकं नव्हत तर तिच्या मनातल्या दुखाची मला एक अंधुकशी भेट होती कारण ती मला अंधारातच भेटली पण आता मी उजेडाचा धनी होतो, पण तरीही तिच्या सांत्वनासाठी व तिला सावरण्यासाठी मी तिला म्हणालो -

" अश्क आंखो में आये तो पीले
दिल जो रोये तो होठो  को सीले
ऐ मोहब्बत तेरे आंसू ओ पे
अब हंसी उनको आने लगी है ! "