आयुष्याची प्रत्येक वाट अशीच
कधी वळणा वळणाची
कधी त्रासाची तर कधी त्यागाची
मी तुझ्यासाठी यातले काहीच
करू नाही शकणार बहुदा …….
पण एक मात्र नक्की करीन
आठवण ठेवीन तुझ्या सोबतीची
आणि त्या क्षणांची
अन मोकळी ठेवीन…….
वाट मी माझ्या मनाची …………
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा !!धृ!!
गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा
उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा
गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा
उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा
राजस रूपड डोई टोपड पाहून सुटतो चाळा
लिंब लोण उतरा गं लवकर दृष्ट लागलं बाळा
राजस रूपड डोई टोपड पाहून सुटतो चाळा
लिंब लोण उतरा गं लवकर दृष्ट लागलं बाळा
कौसल्येचा राम जसा हा लाल यशोदेचा !!१!!
ढोल नगारे घुमू द्या कडे झडती आज चौघडे
शिवनेरीच्या सदरे वर भगवा झेंडा फडफडे
तना मनाचे झिरे हरखले सह्याद्रीचे कडे
बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा !!२!!
गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांब ना हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना तोल माझा सावरू दे थांब ना थांब ना थांब ना .............
दुनिया का सबसे बडा रोग
क्या कहेंगे लोग ……….
जिंदगी मी आप जो करना चाहते है
जरूर किजिए ………….
ये मत सोचिए कि लोग क्या कहेंगे
क्योंकी लोग तो तब भी कुछ कहते है
जब आप कुछ नाही करते ……।
श्वासाला गरज असते फक्त हवेची
नव्हे ती दिसण्याची,
जगण्याला गरज असते पाण्याची
नव्हे त्याच्या चवीची,
प्रेमाला गरज असते भावनेची
नव्हे वारंवार भेटण्याची
प्रेम असंच करायला हवं
कि गरजचं उरणार नाही
पुन्हा पुन्हा भेटण्याची
ती फक्त धुंदी होऊन जावी
प्रत्येक क्षण जगण्याची …………
विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही
दिवस येतात जातात पण मन कुठेच लागत नाही
पाऊस पडून गेला तरी आठवणींचे आभाळ मोकळे होत नाही
आठवण येत नाही असं कधी झालच नाही
आठवण्यासाठी विसरावं लागत विसरता मात्र आलंच नाही